शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

प्लॅस्टिकवर बंदी म्हणजे असून अडचण, नसून..! पर्याय न देताच बंदी : निर्णयावर हवा सकारात्मक विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले,

शरद जाधव ।सांगली : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आणि निर्णयाच्या स्वागताबरोबरच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पर्यावरणप्रेमींनी त्याचे स्वागत केले, तर व्यापाऱ्यांनी त्यावर नापसंती व्यक्त केली. व्यापाºयांचा प्लॅस्टिक बंदीला विरोध नसला तरी, त्याला पर्याय द्या आणि मगच बंदी घाला, अशी मागणी केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची सर्वाधिक गरज असलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करत त्यांना पर्याय आणि प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी यावर निर्णयाचे यश अवलंबून आहे.

प्लॅस्टिकचा बेसुमार वापर व त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास यावर चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे यापूर्वी तीन वेळा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीला अनेक कारणांनी खोडा बसत होता. काही घटकांनी निर्णयाचे स्वागतही केले, तर व्यापारी, विक्रेते, उत्पादकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय असणाºया कागदी अथवा कापडी पिशव्यांचा विषय समोर आला. त्याच्या उत्पादनात आता तरी मर्यादा असल्याने अनेक किरकोळ विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ विक्रेत्यांना लागणाºया प्रमुख साधनांत या पिशव्या असूनल त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे आव्हान शासनासमोर आहे.याठिकाणी होतो : पिशव्यांचा वापरकिराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, मटण, चिकन यासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतो. मटण, चिकन, मासे आदीमध्ये तर प्लॅस्टिक पिशव्यांमुळे माल व्यवस्थित राहत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. तरीही प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणामही लक्षात घ्यावेतॉ, अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत आहेत.प्लॅस्टिक पिशवी काही सेकंदात तयार होते, तर ती नष्ट करण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागत असल्याने, आता समाजातील सर्वच घटकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा व इतर वस्तूंचा सोस सोडणे आवश्यक बनले आहे. प्लॅस्टिक पिशवी कितीही सोयीची असली तरी, शेवटी आपण स्वत:च पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत ठरत आहोत, हेही विसरून चालणार नसल्याने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत, जेवढा होता होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे नागरिकांच्याच हाती आहे. किरकोळ विक्रेत्यांना मालाच्या पॅकिंगसाठीही नवा आणि सुलभ पर्याय दिला, तरच सर्व घटकांकडून या निर्णयाचे स्वागत होणार आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSangliसांगली